‘भारत आता एक अघोषित घटनात्मक “हिंदूराष्ट्र” बनलं आहे की काय’, असा प्रश्न सजग व सुजाण नागरिकांच्या मनात उद्भवणं अतिशय आवश्यक आहे...
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना आमंत्रण नाही, या टीकेला विरोधी पक्षानं सुरुवात केल्यावर हा संगोलाचा विषय भाजपनं मुद्दामच पुढं आणला. खरं तर आपल्या राज्यघटनेतील ७९व्या कलमाप्रमाणं संसदेच्या दोन्ही सभागृहाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. आणि पंतप्रधान व त्यांचं मंत्रीमंडळ यांच्या सल्ल्यानं देशाचा कारभार हाकत असतात. तीच गोष्ट उपराष्ट्रपतींचीही आहे.......